आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

खरीप हंगामी पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि.७ : – कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना दि. १ जुलै ते १४ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम २०२३ मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार अटी व शर्तींवर पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. ७, ७ (अ), ७ (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सादर करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा


COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!