ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसानभरपाई द्या!

आम आदमी पार्टीची मागणी! मुख्यमंत्री व सर्व संबंधितांना निवेदन देऊन धरला आग्रह!!
अमळनेर – अती वृष्टीत शेतकऱ्याचे पीक नव्हे तर संसार वाहून गेला असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असताना कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी व प्रशासन पंचनामा करायला येत नाहीत.. फोटो काढून पाठवा असे सांगतात.. ही मनमानी बंद व्हायला हवी कारण अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाईन काही समजत नाही तसेच प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर सत्य परिस्थिती दिसते म्हणून प्रत्यक्ष पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
आप चे राज्य सचिव धनंजय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. तुषार निकम व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील , प्रा. गणेश पवार, नाना पाटील, राजेंद्र पाटील, भागवत बाविस्कर, स्वप्नील पाटील, नंदु पाटील, रामकृष्ण देवरे, महेंद्र साळुंके, सलीम वायरमन, मुकेश राजपूत, संजीव पाटील, उमाकांत ठाकूर, शहर व तालुका पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी व सर्व संबंधित लोकांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळावा म्हणून आग्रह धारणाऱ्या आम आदमी पार्टीचे वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे धनंजय सोनार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले!
बातमी लाईक करा शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS,
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



