आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना होणारा वीज पुरवठा सुरळीत करून अखंडित ८ तास वीजपुरवठा मिळावा

खा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे व भाजपा पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पाचोरा- महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना होणारा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत असून तो सुरळीत करून अखंडित पद्धतीने ८ तास देण्यात यावा. याकरिता खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

 यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कृषिपंपांना किमान ८ तास वीज देण्याचे धोरण असताना कुठे चार तास तर कुठे दोन तास वीजपुरवठा देण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महावितरण यावर कुठलाही दखल घेऊन उपाययोजना करताना दिसत नाही.त्यामुळे कृषी पंपांना वीजपुरवठा सुरळीत नझाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी बोलताना दिला.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscribe

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!