आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई दि.१२ : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

श्री देसाई आपल्या शोक संदेशात म्हणतात, राहुल बजाज यांना महाराष्ट्राचे उद्योगमहर्षिच म्हटले पाहिजे. त्यांनी केलेला उद्योग विस्तार सर्वांना अचंबित करणारा आहे. स्व. कमलनयन बजाज यांनी सुरू केलेल्या या उद्योगाच्या गंगोत्रीचे राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळामध्ये मोठ्या गंगेत परिवर्तन केले. त्यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार करताना अनेक लघुउद्योजकांची निर्मिती केली. त्यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते. राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाचा जास्तीत जास्त विस्तार महाराष्ट्रात केला याबद्दल खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!